भुसावळ –
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्व प्रशासनाने पूर्वीच रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. तसेच ३० जून पर्यंत पुन्हा सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या बंदच राहतील असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यत आले आहे.
बंद दरम्यान श्रमिक एक्सप्रेस व मालगाड्या चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. आरक्षण व अनारक्षित तिकेटे आरक्षण कार्यालये सुरु झाल्यांतर सहा महिन्यांपर्यंत रद्द करता येणार असून तिकिटाची पूर्ण रक्कम परत मिळणार आहे.
मात्र प्रवाशांनी तिकिटे रद्द करण्यासाठी गर्दी करु नये. तसेच बंद दरम्यान प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर बंदी घालण्यात आल्याचे रेल्वे सुत्रांकडून कळविण्यात आले आहे