Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधपौष महिन्याचे महत्त्व

पौष महिन्याचे महत्त्व

हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याची स्वतःची खासियत असते आणि प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेच्या पूजेला समर्पित असतो. पौष महिन्यात सूर्याच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते कारण या महिन्यात थंडी अधिक वाढते. पौष महिन्याचे महत्त्व जाणून घेऊया.

म्हणून पौष असे नाव पडले

- Advertisement -

पौष महिना हा विक्रम संवतातील दहावा महिना आहे. भारतीय महिन्यांची नावे नक्षत्रांवर आधारित आहेत. वास्तविक चंद्राची पौर्णिमा ज्या नक्षत्रात असते, त्या नक्षत्राच्या आधारे त्या महिन्याचे नाव ठेवले जाते. पौष महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो, म्हणून या महिन्याला पौष महिना म्हणतात.

सूर्यदेवाची पूजा केली जाते – पौष महिन्यात सूर्याला देवाचे रूप मानले जाते. पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून व्रत ठेवण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. काही पुराणांमध्ये पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भगवान विष्णूच्या मंत्राचा उच्चार करताना तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, लाल चंदन, लाल फुले टाकून सूर्याला अर्ध्य अर्पण करण्याची श्रद्धा आहे. असे मानले जाते की या महिन्यात प्रत्येक रविवारी व्रत व उपवास केल्याने आणि तीळ तांदळाची खिचडी अर्पण केल्याने मनुष्य तल्लख बनतो.

पौष हा संपूर्ण महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो, पौष अमावस्या आणि पौष पोर्णिमेला देखील खूप महत्त्व आहे. तसेच मकर संक्रांति हा सण या दरम्यान साजरा केला जातो. एकंदरीत असे म्हणता येईल की पौष महिना आपल्याला आत्मसंयमी बनवून आध्यात्मिक ऊर्जा आणि आत्मोन्नती एकत्रित करण्याची संधी देतो. पौष महिना, सूर्याचे तेज आणि देवगुरू बृहस्पतिच्या दिव्यतेने संपन्न हा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध महिना आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या