मुंबई | Mumbai
राज्यात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यानंतर ५० खोके एकदम ओके अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्यानंतर आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातही याच वाक्यावरून चांगलीच जुंपली.
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येतोय. यांचा वाद मिटवण्यासाठी यांच्यात आता एकनाथ शिंदे मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर हा वाद कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मात्र ‘आर या पार’च्या आहेत. एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा, असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचा मोठा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, बैठकांबाबत मला माहित नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना ‘आर या पार’च्या आहेत. एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा, असं कार्यकर्त्यांचं मत आहे. कारण रवी राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे. आता त्यांनी जे काही आरोप केले, त्याबाबत व्यवस्थित अभिप्राय दिला आणि त्या सगळ्यांमुळे कार्यकर्त्यांचा समाधान झालं तर ठीकं आहे. अन्यथा एक तारखेचा विचार करू असा इशाराही त्यांनी दिला. तसंच जी बदनामी केली ती परत द्यावी, विषय संपला अशी मागणी असल्याचही आमदार कडू म्हणाले.