नगर : आज ८७५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६०१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, नगर ग्रामीण ०३, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०१, राहुरी ०१, कोपरगाव ०२ कर्जत ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८७५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २२२, संगमनेर २४, राहाता ७६, पाथर्डी ५०, नगर ग्रा. ५४, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ८१, श्रीगोंदा ३२, पारनेर ३४, अकोले ४६, राहुरी ४३, शेवगाव ८४, कोपरगाव ३७, जामखेड २४, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *