Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकृषी सल्ला : शेतकऱ्यांनो पेरणीआधी ही बातमी वाचा

कृषी सल्ला : शेतकऱ्यांनो पेरणीआधी ही बातमी वाचा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्यातील घाट विभागात मंगळवारी (दि.२७ ) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून बुधवारी (दि. २८) अति जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता ग्रामीण कृषी मौसम सेवा ऐ.एम.एफ.यु., इगतपुरी केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील घाट विभागात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील पुढील १ ते २ दिवसात जिल्ह्यातील मॉन्सूनचे आगमन लक्षात घेता शेतकरी बांधवानी खरीप पिकांची पेरणी सलग ३ ते ४ दिवस पेरणीयोग्य ७५ ते १०० मी.मी. येवढा पाऊस झाल्यानंतरच करावी,असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा ऐ.एम.एफ.यु., इगतपुरीचे प्रमुख अन्वेषक तथा सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील व संशोधन सहयोगी गजेंद्र फुलपगारे यांनी दिला आहे.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ; तीन दिवसात ६ जणांचा मृत्यू

खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावयाचे असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासावी. जिवाणु संवसर्धक पाकीट सावलीत, थांड जागेत ठेवावे. बियाण्यास बुरशीनाशक अथवा कीटनाशक लावावयाचे असल्यास ती अगोदर लावावीत व त्यानांतर जिवाणु संवर्धक बियाण्यास लावावे.

K Chandrashekar Rao : पंढरपुरात येण्याआधी चंद्रशेखर राव यांचा मटणावर ताव, मिटकरींचा आरोप

दुसऱ्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्यावर वापश्यावर बीजप्रकिया करून मुग व ऊडदाची पेरणी करावी. (प्रति किलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व यानांतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणु संवर्धक) कांदा, वांगी, टमाटे, मीरची, फ्लॉवर व कोबी पीकाच्या रोपवाटीकेसाठी रोपे गादी वाफ्यावर तयार करावेत, असा कृषी सल्लाही त्यांनी दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या