मुंबई | Mumbai
ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.
- Advertisement -
मात्र राज्य सरकारकडून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक वेळेवर होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका होतील असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.