विवाहितेची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी नवरा बाळकृष्ण पांडुरंग बाबर, सासू जीजाबाई पांडुरंग बाबर, दीर निलेश पांडुरंग बाबर, चुलत दीर बाबासाहेब भाऊ बाबर (सर्व रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) या चौघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रशांत काळुराम विशे (रा. कल्याणरोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सौ. सोनाली बाळकृष्ण बाबर (वय 28 ), तर मुलगा रोहित बाळकृष्ण बाबर (वय 3) अशी मयतांची नावे आहेत. लग्नात टी.व्ही, फ्रीज, भांडे दिले नाही. मयत सोनाली हिने विष घेतल्यानंतर व तिच्या झालेल्या उपचारावरील खर्च 70 ते 80 हजार रुपये माहेरून आईवडिलांकडून आणला नाही. मेव्हुणा बाळकृष्ण याच्या लग्नाला माहेरून 50 हजार रुपये आणले नाहीत. या वेगवेगळया कारणावरून बहिण सोनाली हिला मारहाण शिवीगाळ करून, उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला.

या छळास कंटाळून बहिण सोनाली हिने 23 ऑक्टोबरला पिंपळगाव माळवी येथील तलावाच्या पाण्यात तिचा मुलगा रोहित याच्यासह उडी मारून आत्महत्या केली आहे, असे प्रशांत विशे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींविरुद्ध भादंवि कलम 498(अ), 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर करीत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *