Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपाकच्या नापाक कुरापती सुरूच; भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

पाकच्या नापाक कुरापती सुरूच; भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

file photo

नवी दिल्ली | संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करतंय मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. आज पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात भारताचे सहा जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान त्यांची जागा दाखवली. यादरम्यान, दहशतवाद्यांचा घुसखोरीचा आजचा डावही भारतीय सैन्याने उधळून लावत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समजते.

दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे काम  भारतीय सुरक्षा दलाकडून करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये काही दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलाने घेरले. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

याठिकाणी अजूनही दहशतवादी लपलेले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे समजते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या