Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रयेत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरु होणार

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरु होणार

अमरावती | Amaravati

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरु होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं काम आपण केलेलं असेल. आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू. या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू.”

नागपूर ते मुबंई या ७०१ किलोमीटर मार्गवरील १०१ किलोमीटरचा रस्ता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातील ४९ गावातून जातो. इगतपुरीमधील २३ तर सिन्नर मधील २६ गावांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नावाने नावारुपाला येणाऱ्या या विकासाच्या महामार्गात नाशिकचे ही मोठे योगदान असून पहिल्या टप्प्यात नाशिक ते शिर्डी आणि दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते मुंबई असा रस्ता खुला होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या