करवाढीबाबत आ. काळेंनी उचललेले पाऊल कायदेशीर- अ‍ॅड. धोर्डे

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपरिषदेने लावलेली अवास्तव करवाढ ही बेकायदेशीर आहे. त्याबाबत कायदेशीर पद्धतीने त्यातून मार्ग निघणार असून आ. आशुतोष काळे यांनी उचललेले पाऊल कायदेशीर आहे. त्या माध्यमातून कोपरगावकरांना निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास अ‍ॅड. शंतनू धोर्डे यांनी व्यक्त केला.

कोपरगाव नगरपरिषदेने खासगी कंपनीकडून केलेल्या सर्व्हेतून केलेली करवाढ चुकीची त्याबरोबरच बेकायदेशीर आहे. त्याबाबत आ. काळे यांनी बैठक घेऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून त्याबाबत नगरपरिषदेने सविस्तर खुलासा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरपरिषदेने खुलासा केल्यानंतर करण्यात आलेली करवाढ चुकीची व करवाढीच्या बजाविण्यात आलेल्या नोटिसा देखील बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर करवाढ करताना मालमत्तेचा होणारा घसारा कुठेही धरण्यात आला नव्हता. अशा अनेक बेकायदेशीर बाबी आ. काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच नगरपरिषद प्रशासनाने देखील चुका मान्य करून योग्य तो बदल करण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासनाने जबाबदारी स्वीकारत ज्या खासगी कंपनीने हा सर्व्हे केला, त्या कंपनीला बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सर्व बदल झाल्यानंतर करण्यात आलेली करवाढ कमी होणार आहे. आ. काळेंनी अवलंबिलेला मार्ग कायदेशीर असून या मार्गानेच हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रशासनासोबत राहून प्रशासनाशी चर्चा करून कायदेशीर मार्गाने जावे लागणार आहे. यामध्ये करवाढ कमी करण्याबाबत दुरुस्ती प्रस्ताव सादर करणे, त्याला मंजुरी मिळविणे, समितीपुढे मंजुरी घेणे या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. शंतनू धोर्डे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *