लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत निर्बंध लागू

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

महाराष्ट्रातील (Maharashtra) 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केली होती. औरंगाबाद जिल्ह्यात (Corona) कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असला तरी जोपर्यंत शासनाचे लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी सांगितले आहे.‌

शासनाच्या 25 जिल्ह्यांच्या यादीत औरंगाबादचे नाव असले तरी मात्र लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत शासनाकडून काहीही सुचना, आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.‌ व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची मागणी केली असली तरी शासनाकडून काहीही सुचना न आल्यामुळे जिल्ह्यात सध्या Lavel-3 चेच निर्बंध लागू राहणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *