रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींसाठी रविारी मतदान प्रक्रिया पार पाडली. कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडली .भोजडे गावातील रहिवासी संदीप भास्कर घनघाव याचे रविवारी लग्न होते.
संदीपने लग्न लागल्यानंतर नववधू सोनमला सोबत घेऊन मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला आहे. नवरदेव नवरीला मतदान केंद्रावर पाहून उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. अनेक शिक्षीत तरून मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जातात. मात्र संदीपने विवाहाच्या दिवशीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचे भोजडे ग्रामस्थांनी कौतुक केले.