Friday, April 26, 2024
Homeनगरदोन हजारांहून अधिक मजूरांच्या जेवणाचा खर्च प्रशासनाकडून – पालकमंत्री

दोन हजारांहून अधिक मजूरांच्या जेवणाचा खर्च प्रशासनाकडून – पालकमंत्री

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – नगर जिल्हयातील मजूरांसह बाहेरच्या जिल्हयात्यातून प्रवास करणाऱ्या मजूरांना नगरसह तालूक्याच्या ठिकाणी थांबविण्यात आले आहे. अशा नगर शहरातील y९८ तर जिल्ह्यातील १ हजार ४१४ व्यकींच्या दोन वेळचे जेवण नाश्ताची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असल्याची माहीती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरू केली आहे. आता शहराबरोबरच आता पारनेर, राहुरी या ठिकाणी भोजन व्यवस्था सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. देशामध्ये अन्नधान्याचा साठा मुबलक आहे. कुठेही ते कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. मात्र विनाकारण जर कोणी काळाबाजार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या