मुंबई | Mumbai
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान असलेल्या महात्मा गांधींची आज १५२ वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील साजरा केला जातो.
महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात शांतता टिकून रहावी, यासाठी गांधीजी यांनी सातत्याने प्रयत्न केले. दरम्यान गांधी जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओने ‘वैष्णव जन तो’ हे गीत सादर करत गांधीजींना मानवंदना दिली आहे.