Thursday, April 25, 2024
Homeनगरअलविदा...गांधी साहेब

अलविदा…गांधी साहेब

अहमदनगर (प्रतिनिधी) –

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये शासकीय

- Advertisement -

इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी (दि. 17) पहाटे दिल्ली येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला होता. दिल्ली येथून दिवंगत गांधीचे पार्थिव शववाहिकेतून नगरमध्ये आणण्यात आले. त्यांचे पार्थिव जिल्ह्यात आल्यानंतर ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याला अखरेचा निरोप देण्यासाठी गुरूवारी सकाळपासून नगर शहरातील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागली होती.

अंत्यायात्रा गांधी यांच्या निवासस्थानापासून, गुरुदेव आनंद ऋषीजी समाधी, बुरुडगाव रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हाय वे वरून मार्केटयार्ड चौक, बंगाल चौकी, बांबू गल्ली, चर्च रोड, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बँक चौक, नवी पेठ, नेता सुभाष चौक, भाजप कार्यलय, आनंदी बाजार, नालेगाव मार्गे जावून अमरधाम अशी पोहोचली.

दरम्यान चाहत्यांनी अमर रहे.. अमर रहे.. गांधी साहब अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा, गांधी साहेब नाम रहेगा अशा घोषणा दिल्या. अंत्य यात्रा मार्गावर चाहत्यांनी अभिवादन करुन दर्शन घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या