नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आपण काही निर्बंध शिथिल केले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक आणि कमी आवश्यक अशा वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी बाजारपेठांत केलेली दिसून येत आहे. नाशिककरांची उसळलेली गर्दी धोक्याची घंटा आहे…
- Advertisement -
दर शुक्रवारी करोना परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबर निर्णय जिल्हास्तरावर घेतला जाणार आहे. त्यामुळे आपण सद्यस्थितीत दहा टक्क्याच्या आत आहोत. मात्र, जर रुग्णसंख्या वाढली तर नाईलाजाने पुन्हा नाशिकवर लॉकडाऊनचे संकट ओढवले जाऊ शकते. त्यामुळे नाशिककरांनी आताच काळजी घेणे गरजेचे आहे. आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.