मुंबई –
करोनाच्या संशयीत रूग्ण संखेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उपाययोजना व खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येतील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची जाहीर केले.
- Advertisement -
तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास गरजेनुसारच करावा, मॉलमध्येही जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यात करोनाचे आतापर्यंत १७ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० रूग्ण पुण्यातील आहेत. या रूग्णांमधील करोनाची लक्षणं ही गंभीर नाहीत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.