दिल्ली | Delhi
अरुणाचल प्रदेशच्या इटानगर येथील इंदिरा गांधी पार्कजवळ राष्ट्रीय महामार्ग-४१५ चा काही भाग अतिमुसळधार पावसानंतर कोसळला. दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
- Advertisement -
या महामार्गाचे झालेले नुकसान पाहून रस्ता पुन्हा नीट करण्यासाठी महिनाभर कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे बांधकाम अलीकडेच झालं होतं. तरीही या मोठ्या पावसात त्याचा टिकाव लागू शकला नाही. म्हणजेच त्याचं काम कितपत योग्य झालं होतं, याबाबत आता परिसरातील लोक शंका उपस्थित करत आहेत.