अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अरणगाव येथील अमरधाममधील मृतदेह जाळण्यात येणार्या जाळ्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याघटनेमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
अरमधाममध्ये चार ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. या चारही ठिकाणी हून जाळ्या चोरीला गेल्या आहेत. चोरांनी चोरीसाठी अमरधाम देखील सोडले नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येत आहे. या जाळ्यांची चोरी स्थानिक भुरट्या चोरांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चोराचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अरणगाव (ता. नगर) हे लोह मार्गानजीक आहे. लोहमार्ग परिसरात अनेक भुरट्या चोरांचा तळ बनला आहे. हे चोर चोरी करण्यासाठी दिवसा लक्ष ठेवतात आणि रात्री बाहेर पडतात.
या भुरट्या चोरांची टोळीच अरणगाव परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांनी माहिती काढून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
चोरांचा बंदोबस्त करा : मयुर थोरात
गेल्या काही दिवसांपासून अरणगामध्ये भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री अनेक भागातून भोरटे चोर फिरत असतात. काहींना चोरांचा सामना देखील केला आहे. या भुरट्या चोरांच्या हातात शस्त्र देखील असतात. त्यांना प्रतिकार केल्यावर ते हल्ला करतात. दगड फेकून मारतात. घरावर दगड फेकतात. त्यामुळे या भुरट्या चोरांची दहशत वाढली आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर तालुका पोलिसांनी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी मयुर थोरात यांनी केली आहे.