Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकओझर ग्रामपालिकेच्या निवडणुकीत अनिल कदम गटाची माघार

ओझर ग्रामपालिकेच्या निवडणुकीत अनिल कदम गटाची माघार

ओझर | Ojhar

येथील नगरपरिषदेच्या उद्घोषणेनंतरही जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने माघार घेतल्यामुळे नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर एकूण चार वार्डात सात जागेसाठी निवडणूक होणार आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात 4 डिसेंबर रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील 13 ग्रामपंचायतिचे पदोन्नत्ती करण्याचे ठरविले होते. यात ओझर ग्रामपालिकेचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे ओझरची प्रशासकीय प्रकिया सर्वात पुढे असताना निवडणूक आयोगाने त्या आधीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने न्यायालयाने कमी कालावधीसाठी का होईना आपला निर्णय कायम ठेवला.

सुरवातीला दोन पॅनल मध्ये सरळ लढत दिसत असताना शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकत अर्ज माघारी घेतले.त्यामुळे एकूण पाच वार्डात दहा उमेदवार हे नागरिक आघाडीचे बिनविरोध निवडून आले आहे.तर प्रभाग 2,4,5 व 6 मध्ये सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

दिंडोरी पॅटर्नची झाली आठवण

2015 मध्ये दिंडोरी ग्रामपालिकेचे नगरपंचायत मध्ये रूपांतरित झाल्यानंतर तेथील सर्वच नागरिकांनी ग्रामपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.त्यामुळे लगेच सहा महिन्यात शासनाने प्रक्रिया गतिमान केली व नगरपंचायत अंमलात आली.

ओझरच्या बाबतीत मात्र अनिल कदम गटाने माघार घेत थेट नगरपरिषद निवडणूकित उतरण्याचे ठरवल्याने यतीन कदम गटाचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले तर एका गटाने रिंगणात कायम राहण्याचा ठाम पवित्रा घेतला.

येत्या दोन महिन्यांत होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूकीमुळे मतदारांना संभ्रमात न ठेवता शिवसेना ताकतनिशी उतरणार आहे. गावातील जनतेने माघारीमुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये. घोषणेनंतर हरकतीचा कालावधी संपल्याने नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.

-अनिल कदम, माजी आमदार

- Advertisment -

ताज्या बातम्या