शेतीच्या वादातून कुंटूंबास बेदम मारहाण

jalgaon-digital
1 Min Read

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील सांगवी येथे शेतीच्या वादाच्या व शेतात गुरे बांधण्याच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने कुर्‍हाड, लोंखडी गज, लाकडी दांड्यांनी एका कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण केली. दरम्यान जामखेड पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध खुणाच्या प्रयत्नाबरोरबच इतरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील सांगवी येथे रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास यातील संशयित आरोपी भागवत डिगांबर महारनवर, संजय डिगांबर महारनवर, वैभव भागवत महारनवर, योगेश संजय महारनवर, राम कुवर भागवत महारनवर, उर्मिला संजय महारनवर, सुशिला डिगांबर महारनवर (सर्व रा.सांगवी, ता. जामखेड) यांनी संगनमत करुन तीन एकर शेतीचे वादातुन तसेच जनावरे शेतात बांधल्याचे कारणावरून यातील फिर्यादी महादेव जालींदर महारनवर, त्यांचे वडील जालिंदर महारनवर, आई- इंदूबाई, भावजय अलका महारनवर, मुलगा विशाल महारनवर यांना लोखंडी गजाने, लाकडी काठीने, कुर्‍हाडीने मारहाण व शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यातील जखमी हे जामखेड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जामखेड पोलीस स्टेशनला संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *