Friday, April 26, 2024
Homeनगरआढळातून आज आवर्तन सोडणार

आढळातून आज आवर्तन सोडणार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील आढळा मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीस 1004 दलघफू (94%) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. दिनांक 6 सप्टेबर 2023 पर्यंत आढळा प्रकल्पाच्या उजवा व डावा कालवा मिळून 350 हेक्टर क्षेत्राची मागणी प्राप्त झाली होती, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांनी शेतीसाठी आवर्तनाची केलेली मागणी विचारात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थिती समजावून घेत टंचाई परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी खरीप आवर्तन सोडण्याचे आदेश अहमदनगर पाटबंधारे विभागास दिले आहेत. त्यानुसार आवर्तन सोडण्यात येणार असून, सदर आवर्तनामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील 13 गावांमधील पिकांना फ़ायदा होणार असून लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या