Friday, April 26, 2024
Homeनाशिकविभागात 7 हजार 123 कोटी पीक कर्ज वाटप

विभागात 7 हजार 123 कोटी पीक कर्ज वाटप

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

खरीप हंगामासाठी विभागातील नाशिक, जळगांव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 28 हजार 703 हेक्टर क्षेत्रासाठी 7 हजार 123 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ विभागातील 7 लाख 73 हजार 438 शेतकर्‍यांना होणार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

खरीप हंगाम 2020-21 करिता विभागातील एकूण उद्दीष्टे 11 हजार 151 कोटी 25 लाखाचे असून त्यापैकी 7 हजार 123 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने 93 टक्के इतके लक्षणीय असे कर्जवाटप केले आहे. खरीप पीक कर्ज वाटपात 2 लाख 37 हजार 972 नियमित कर्जदार शेतकर्‍यांना 1 हजार 414 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

तसेच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्त योजनेतील 3 लाख 19 हजार 255 शेतकर्‍यांना 1 हजार 555 कोटी 41 लाखांचे कर्ज वाटप तर 17 हजार 901 नवीन सभासद झालेल्या शेतकर्‍यांना 60 कोटी 63 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 3 हजार 303 कोटी रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 2 हजार 300 कोटी रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 70 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 1 लाख 17 हजार 419 शेतकर्‍यांना झाला आहे.

जळगांव जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 2 हजार 892 कोटी 68 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 1 हजार 320 कोटी 41 लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 46 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 2 लाख 18 हजार 367 शेतकर्‍यांना झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 3 हजार 410 कोटी 68 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 2 हजार 804 कोटी 80 लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 82 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 3 लाख 63 हजार 34 शेतकर्‍यांना झाला आहे.

धुळे जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 928 कोटी 16 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 426.39 कोटी रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 46 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 49 हजार 561 शेतकर्‍यांना झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 615 कोटी 98 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 271 कोटी 11 लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 44 टक्के झाले आहे. पीक कर्जाचा लाभ 25 हजार 57 शेतकर्‍यांना झाला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या