नवी दिल्ली – केंद्र सरकारने एप्रिल 2020साठी देशातील 545 कारखान्यांना साखर विक्रीसाठी 18 लाख टन कोटयाचे वाटप केले आहे. याबाबत 26 मार्चला सरकारने आदेश दिले आहेत.
दरम्यान खाद्य मंत्रालयाने मार्च 2020 साठी 21 लाख टन साखर कोटयाला मंजूरी दिली होती.तसेच काही दिवसांपूर्वीच, कोरोना व्हायरसचा चा धोका पाहता खाद्य मंत्रालयाने मार्चसाठीच्या साखरेची मासिक विक्रीची मुदत 15 दिवस वाढवून 15 एप्रिल 2020 पर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता.