मुंबई : अत्याधुनिक सुविधा असलेल्या वायफाय युक्त बस ग्रामीण भागासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
तसेच येत्या काळात एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून 1600 नवीन बस, शिवाय बसस्थानके आधुनिक करण्यासाठी निधी देणार असल्याचेही ते म्हणाले.
- Advertisement -
अजित पवार आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला.त्यामुळे शिवशाहीच्या नव्या दमाच्या बसेस नंतर पुन्हा महाविकास आघाडी १६०० बसेस राज्य परीवहणच्या ताफ्यात दाखल करणार असल्याने लालपरीचा चेहरा मोहरा बदलणार आहे.