कोंढवड |वार्ताहर| Kodhawad
राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल दुसर्या दिवशी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान शनिवारी (दि.20) परिसरातील शिलेगाव, कोंढवड, तांदुळवाडी, देसवंडी या भागात वादळी अवकाळी पावसाने व गारपिटीने जवळपास तासभर तांडव केल्याने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेल्या घासात माती कालवली. काही ठिकाणी काढणीला आलेला गहू, कांदा, मका, ऊस जमीनदोस्त झाले.
या अवकाळी तडाख्यातून वाचलेल्या पिकांना काल झालेल्या पावसाने झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या भागात ऊस तोडणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून या अस्मानी संकटामुळे तोही रेंगळण्याची शक्यता आहे.