- मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होण्याची शक्यता स्थलसेना अध्यक्ष जनरल दीपक कपूर यांनी वर्तविली असून भारत अशा कुठल्याही हल्ल्याचा सामना करायला पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. एका समारंभात जनरल कपूर म्हणाले, की मुंबई सारखे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली असून असा हल्ला पुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय लष्कर असा हल्ला मोडून काढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.