- ‘प्रयास’च्या प्रयत्नांमुळे तरुणाईला विद्यार्थीदशेतच सामाजिक दिशा मिळेल, असा विश्वास पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संभाजी पठारे यांनी व्यक्त केला.
पुणे विद्यापीठ व प्रयास ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील सिंहगड व काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने तालु्नयातील विविध गावात 9 दिवस संगणक साक्षरता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या समारोप प्रसंगी डॉ. पठारे बोलत होते. अभियान काळात प्रशिक्षणार्थींनी तालु्नयातील 88 गावांतील 153 गावातील शाळांना भेटी देऊन 28 हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले. विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
समारोप समारंभात या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. डॉ. पठारे पुढे म्हणाले की, शिक्षणातून संपादन केलेल्या ज्ञानाचा फायदा ग्रामीण भागाला व्हावा हा ‘प्रयास’चा उपक्रम असून, या ज्ञानाचा उपयोग प्रशिक्षणार्थींच्या आयुष्याच्या जडणघडणीत मोलाचा ठरणार आहे.
विद्यार्थी हे समर्थ भारताचे महत्त्वाचे घटक असल्याने एकात्मिक ग्रामीण विकासात पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तेजस मोरे, प्रा. जाधव, तसेच प्रशिक्षणार्थींनीही मनोगत व्यक्त केले.
|