Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आयसीसीची स्पॉटफिक्सर खेळाडूंवर तात्पुरती बंदी   वाळूतस्करांना दणका; 5 कोटींचा दंड!   पोलिसांचे धरपकडसत्र; 9 आरोपी जेरबंद   जवळकेत शेतकरी आत्महत्या   मास्टरब्लास्टर झाला हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन   पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून   सोनिया कॉंग्रेसच्या ‘विक्रमी’ अध्यक्षा   अपहृत पोलिसांच्या शोधासाठी मोहीम तीव्र   Updated on September 4, 2010, 20:24:34 hrs

मुख्य पान | बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी)- (09-February-2010)
Tags : Ahmednagar
 

जिल्ह्यातील बॅण्ड कलाकार, मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बॅण्ड पथकासह पोतराज व कलाकार सहभागी झाले होते. मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून माळीवाडा, पंचपीर चावडीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेला. सुधीर वैरागर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात दिलीप सकट, पोपट सरोदे, अजय वाल्हेकर, एकनाथ पाचरणे, शांतावन खंडागळे, भीमबाई खंडागळे, द्वारका कुमावत यांच्यासह जिल्ह्यातील कलाकार या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सुमारे 20 हजार बॅण्ड कलाकार असून त्यांना हंगामी काम मिळते. यामुळे उपेक्षितांचे जीवन हे कलाकार जगत असून सरकारने त्यांचे प्रश्न त्वरित सोडावे अशी मागणी करण्यात आली. तसेच बॅण्ड कलाकारांना पेन्शन योजना सुरू करावी, मोफत औषधोपचार, मोफत शस्त्रक्रिया सुविधा मिळावी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत बदल करून मातंग समाजाच्या लाभार्थींना जमिनी उपलब्ध न झाल्यास बॅण्ड व्यवसायासाठी कर्ज, सूत दोरखंडासाठी कर्ज, ट्रॅ्नटर, प्रवासी वाहतूक टॅ्नसीकरिता कर्ज मिळावे, समाज कल्याण कार्यालयाकडून घरकुल योजनेसाठी लकी ड्रॉ काढण्यात यावा, तसेच स्वस्त धान्य, रॉकेल दुकान परवाना मातंग समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात यावे, टोका व प्रवरासंगम अणि नेवासा तालु्नयातील तेलकुडगाव येथील शासकीय जागेतील अतिक्रमण कायम करण्यात यावे, जिल्ह्यातील नवीन गावठाणमधील मागासवर्गीयांचे अतिक्रमण नियमानुकूल करावे, अनुसूचित जातीच्या 13 टक्के आरक्षणाची विभागणी करून मातंग समजास स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे व मागासवर्गीय महामंडळ कर्जमाफी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, बॅण्ड कलाकारांसाठी शासनाची योजना नसल्याने ती सुरू करावी अशा मागण्यांसाठी कलाकारांनी संगीत मोर्चा काढला होता. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी यानंतरचा मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येणार असल्याचाइशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.


प्रिंट काढा