- महापालिकेच्या विविध ठिकाणच्या गाळेधारकांनी बेकायदेशीररित्या गाळे परस्पर भाड्याने दिल्याने व्यापारी संकुलाच्या 3 कोटी उद्दिष्टावर पोट भाडेकरूंच्या शिरजोरीने पाणी फिरण्याची श्नयता आहे.
महापालिकेने शहरासह विविध ठिकाणी व्यापारी संकुले उभारली आहेत. या व्यापारी संकुलातील गाळे दुकानदारांना करार पध्दतीने भाड्याने दिली होती. ती मूळ मालकास परस्पर भाड्याने देता येणार नाही, असा संकेत आहे. मात्र अनेक दुकानदारांनी हे नियम धाब्यावर बसवून ते परस्पर भाड्याने दिले. महापालिकेची थकबाकी मात्र मूळ मालकाच्या नावे आहे. त्यामुळे पोटभाडेकरू ही थकबाकी भरण्यास तयार नाहीत. महापालिकेच्या वसुली विभागास प्रशासनाने येत्या 31 मार्चपर्यंत 3 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले. मात्र पोटभाडेकरू असलेले दुकानदार मूळ मालकाच्या नावे असलेली थकबाकी भरणे तर दूरच पण वसुली पथकास दारात उभे देखील राहू देत नाही. कारण ते मालकास रितसर भाडे देत असल्याने महापालिकेची थकबाकी भरण्याचा सवालच नाही असा उलट प्रश्न ते वसुली पथकास करत आहे.
पोलिस संरक्षणात गेलेल्या वसुली पथकास यामुळे कारवाई न करताच हात हालवित मागे फिरावे लागत असून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण बनले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या व्यापारी संकुलांच्या थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. तो वसूल करण्यात महापालिकेस अपयश आले. मूळ मालकांत राजकीय हितसंबंध असलेली मंडळींचाच समावेश आहे. त्यामुळे वसुली करण्यास कर्मचारी धजावत नाहीत. मात्र आयु्नत संजय काकडे यांनी मार्केट विभागातील कर्मचार्यांना कोणत्याही परिस्थितीत वसुली करा, अन्यथा निलंबानाची कारवाई करण्यात येईल असे सुनावले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा वसुलीच्या कामास लागली. पण गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याने परस्पर दुकाने भाड्याने देण्यात आली असून त्यांच्याकडून वसुलीस प्रतिसाद मिळत नाही. |