|
| पवारांचे पंख कापा- मोहन प्रकाश |
|
| Mumbai(07-February-2010) |
Tags : News,Regional,Political,National,Maharashtra |
मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) - केंद्रीय कॉंग्रेस कार्यकारिणीच्या कालच्या बैठकीत कृषिमंत्री शरद पवार यांच्या खात्याच्या विभाजनाची मागणी झाली असताना शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी महागाईच्या मुद्यावरून पुन्हा पवारांवर शरसंधान सोडले. कृषिमंत्रीपद आणि ग्राहक संरक्षण ही दोन्ही खाती एकाच मंत्र्याकडे असल्याने महागाईतून जनतेला दिलासा देताना अडचणी येत आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी याचा विचार केला पाहिजे. दोन्ही खाती एकाच मंत्र्याकडे असण्याची ही अलिकडचया काळातील पहिलीच वेळ असल्याचे मोहन प्रकाश यांनी आज निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीचा सर्वसामान्य मुंबईकरांवर सकारात्मक प्रतिसाद पडल्याचे निरीक्षण मोहन प्रकाश यांनी मांडले. कालच्या दौर्यात सामान्य जनता ही शिवसेना आणि मनसेच्या संकुचित राजकारणापेक्षा राहुल गांधींच्या सौजन्यशील लोकशाहीवादी राजकीय भूमिका पसंत करते हेच अधोरेखित झाल्याचे मोहन प्रकाश म्हणाले. राहुल यांच्या दौर्यामुळे सेना आणि मनसेच्या मराठी मुद्यातील हवा गेली. मीडियाने बागवेंसारख्या गरीब माणसाला नाहक गोवले, अशी सारवासारव कॉंग्रेसचे प्रेदशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केली. बागवे यांनी राहुलचे जोडे उचलले हा मीडियाचा आक्षेप चुकीचा असल्याचे ठाकरे म्हणाले.
|
प्रिंट काढा |
|
|
|