मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) - लहानपणी ज्यांना धड बोलता येत नव्हते, बोबडे आणि तोतरे बोलण्यात जे लहानपणी धन्यता मानत होते, त्यांना आम्ही कसे बोलावे हे शिकविले, त्यामुळे त्यांनी आम्हाला राजकारणाचे धडे देऊ नये अशी टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मराठी माणूस आणि महाराष्ट्र व शिवसेना यांच्यातला अतुट भावबंध कोणतेही बाटगे कितीही तोडू पाहत असतील तर त्यांना ते जमणार नाही, असा दावाही त्यांनी केला. ते पुणे येथे एका प्रकट मुलाखतीत बोलत असताना त्यांनी हे टीकास्त्र सोडले. |