Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आश्वासनानंतर पारधी समाजाचे उपोषण मागे   देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ   दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट   पालकमंत्र्यांची श्रीक्षेत्र देवगडला भेट   दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट   मांजरपाडा-2चे सर्वेक्षण तातडीने करा- उपमुख्यमंत्री छगन भुजबळ    महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ   कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले   सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’   चव्हाणांच्या याचिका माघारीने स्थायीचा मार्ग मोकळा   ठेकेदारासाठी जकात खासगीकरणात विशिष्ट अटी   आरोग्य सुविधांसाठी विमा योजना सुरू करण्याचा मानस ः मुख्यमंत्री   पूर्ववैमनस्यातून बालकाची निर्घृण हत्या   रमेशचा मृत्यू मानेवर पाय पडल्याने   राज्यात अवकाळी पाऊस    50 ट्नके ह्नकाची गरज ः मेधा पाटकर    अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत    तोफगोळ्याच्या स्फोटात तीन ठार    सीईटी निकालाचा गोंधळ सुरूच    धान्य मद्यनिर्मिती अनुदानावरील स्थगिती उठवली   ‘त्या’ साधूंना फाशी द्यावी ः रामदेवबाबा   आंतरजातीय विवाहाला आता 50 हजार रुपये    सचिन तेंडुलकरच्या सह्यांतून 11 लाखांची मदत   बेशिस्त युनूस, युसूफवर आजन्म बंदी   आयपीएल स्थगितीची याचिका फेटाळली    श्रीलंका संघात जोयसाचा समावेश   पॉंटिंग पहिला आठ हजारी कर्णधार   कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’   ‘पंचायत राज’ पुरस्कारापासून यंदाही ‘झेडपी’ वंचित   प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरण्याचे आदेश   ‘तमाशा’ उरला आता यात्रेपुरता!   नम्रता कले्नशनसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा   संशयिताचे रेखाचित्र तयार   ‘टिंग्या’ला मिळणार नवे पालक   बंद उद्योगांचे भूखंड ताब्यात घेणार   बारावीच्या उत्तरपत्रिका रेल्वेखाली   लोकसभा तहकूब   वीज पडून 1 ठार; दोघे चिंताजनक   छपराला आग; दोन बालकांचा करुण अंत   Updated on March 11, 2010, 11:04:51 hrs

मुख्य पान | शिवसेनाप्रमुखांना नैराश्य
शिवसेनाप्रमुखांना नैराश्य
Mumbai(07-February-2010)
Tags : Nashik,News,Regional
 

मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) - पाकिस्तानने 26/11 सारखे हल्ले कधी आणि कोठेही करावेत. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले सुरूच रहावेत आणि तरीही पाकिस्तानी खेळाडूंनी या देशात खेळण्याची परवानगी द्यावी. शिवसेना कोणालाही अडवणार नाही, असे उद्विग्न उद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. मराठी माणसाच्या वाटेला जावून जर कोणी महाराष्ट्र मुंबईपासून तोडण्याचे कारस्थान केले तर त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही शनिवारी पुन्हा त्यांनी दिला. कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबईत केलेल्या दौर्‍यामुळे शिवसेनेचे निषेध आंदोलन पुरते ‘फ्लॉप‘ ठरले. त्यामुळे उद्विग्न होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना‘ या मुखपत्रातून आपला संताप व्यक्त केला आहे. कॉंग्रेसच्या कृपेमुळे देशात कोणीही खुशालपणे हैदोस घालावा शिवसेना त्याला विरोध करणार नाही, असे सांगत शिवसैनिकांनी स्वत:ची टाळकी फोडून, सालटी सोलून घ्यायची, कारण नसताना तुरूंगवास भोगायचा हे सर्व कोणासाठी आणि का करावे? असा सवाल त्यांनी मराठीजनांना विचारला आहे. राहुलच्या दौर्‍यात कॉंग्रेसचे मंत्री रमेश बागवे ‘युवराजांचे‘ जोडे उचलून निष्ठेचे ओंघळवाणे प्रदर्शन करतात. तरीही कोणाला घातली हे कोणीच समजून घेत नाही. शाहरूख खान पाकिस्तानवर प्रेम करा सांगतो. तरीही येथे कोणाचा श्र्वास का घुसमटत नाही, असे उद्विग्न प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी उपस्थित केले आहेत.


प्रिंट काढा