Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | यंदाची थंडी १५ मार्चपर्यंत
यंदाची थंडी १५ मार्चपर्यंत
पुणे, दि. २ (प्रतिनिधी) -(03-February-2012)
Tags : Maharashtra,weather news, coll weather, coll weather till 15 march
 

पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - जानेवारीअखेर राज्याच्या बहुतेक भागांतून गायब होणारी थंडी यंदा मार्चच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. सलग तीन-चार वर्षे जानेवारीअखेर थंडी गायब झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली होती. चालू हंगामातही १५ मार्चपर्यंत हिवाळा कायम राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत किमान तापमानातील चढ-उतारांत मोठ्या प्रमाणात विविधता निदर्शनास येत आहे. राज्यात संक्रांतीनंतर थंडी कमी होऊन उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होते. फेब्रुवारीच्या मध्यापासूनच बहुतेक भागात उन्हाचा कडाका जाणवू लागतो. मात्र, गेल्या दोन वर्षांत यात बदल निदर्शनास येत आहेत. येत्या दीड महिन्यातही किमान तापमान सरासरीहून कमी राहण्याचा व काही ठिकाणी हुडहुडी भरविणारी थंडी अनुभवास येण्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात किमान तापमानात सरासरीहून लक्षणीय वाढ झाली. किमान तापमान सरासरीहून औरंगाबादमध्ये सर्वाधिक सात अंशांनी वाढले, तर मालेगाव येथे सहा अंशांनी घसरले होते. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.


प्रिंट काढा